देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळण्यापेक्षाही आर्थिक स्वातंत्र्याची अधिक गरज आहे हे जाणून महात्मा गांधींनी स्वदेशीच्या पुरस्कारावर आपले लक्ष केंद्रित केले. शहरापेक्षा ग्रामीण भागात जितके उद्योगधंदे वाढविता येतील तितके वाढवावेत आणि अशा प्रकारे आर्थिक प्रगतीचे विकेंद्रीकरण व्हावयास हवे असा त्यांचा आग्रह असे. 

- आबासाहेब गरवारे