बँकांनी या उद्योगधंद्यांना अधिक कर्जपुरवठा करता येईल काय ह्याचा विचार केला पाहिजे. पूरग्रस्त उद्योगधंद्यांना विस्तृत बाजारपेठ, चांगले तांत्रिक ज्ञान आहे. भांडवलपुरवठा हीच काही पूरग्रस्त उद्योगधंद्यांची मुख्य अडचण आहे. म्हणूनच त्यांची कर्ज परतफेडीची कुवत ठरविताना बँकांनी उपरोल्लेखित गोष्टी लक्षात घ्याव्या आणि  त्यांना भाडवली वस्तू निर्माण करण्यासाठी कर्जे द्यावीत. 

- आबासाहेब गरवारे