भ्रामक समजुतींचे निराकरण ही नियोजन कार्याची सुरुवात असते व त्याकरिता उद्योगपतींनी प्रभावीपणे प्रचारकार्य करणे अत्यंत जरूरीचे आहे. प्रत्येक उहान-मोठ्या कारखान्यात कुटुंबनियोजनाच्या पुरस्कारासाठी एखादी समिती नेमली जावी. या समितीने कुटुंबनियोजन कार्याचा प्रचार करण्याच्या दृष्टीने कारखान्यातील व्यक्तीची माहिती गोळा करून तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करावीत आणि नियोजनविषयक साधनांचा उपयोग, व त्या संबंधीची माहिती द्यावी व शंकांचे निवारण करावे. 

- आबासाहेब गरवारे