ज्या समाजगंगेने आपल्याला जोपासले, त्या समाजगंगेच्या ऋणाची जितकी शक्य आहे तितकी, जेव्हा शक्य आहे तेव्हा परतफेड केली पाहिजे. अशा परतफेडीने कर्तव्य केल्याचा अत्यानंद मिळतो असा माझा अनुभव आहे. ह्या आनंदाचा अनुभव मला जीवनात उपभोगायला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो. प्रत्येकाने पाण्याचे कलश घेऊन जाण्यापेक्षा वाटीभर दूध  जरी मंगल कलशात टाकलं तरी "सत्यं शिवं, सुंदरम्" रूपी मंदिराचा गाभारा दुधाने भरून जाईल.

- आबासाहेब गरवारे