महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकासात श्री आबासाहेब गरवारे यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात स्वतःचा उद्योग सुरु केला तर स्वातंत्र्यानंतर परिस्थितीचे व काळाचे आव्हान स्वीकारून उद्योगधंद्याची प्रगती केली.  उद्योगधंद्यासाठी लागणारी कल्पक बुद्धी, चिकाटी आणि उत्साह आबासाहेबांमध्ये आहे. त्यांच्यातील राष्ट्रीय बाणा प्रामुख्याने वाखाखण्यासारखा आहे. हाती घेतलेल्या कार्याबद्दल आस्था, मनमिळावू आणि उदार स्वभाव यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत सतत भर पडली आहे. 

- यशवंतराव चव्हाण