आबासाहेबांचा व्यवसाय प्रगती करत असताना, विमलाबाईंनी कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे निभावल्या. मुलांना उत्तम संस्कार दिले. त्यांनी आणि आबासाहेबांनी केलेले दान यातून त्यांचे जीवन समाजऋणातून मुक्ती मिळवणारे ठरले. विमलाबाईंचे जीवन म्हणजे श्रद्धा, संयम, शिस्त, प्रेम, त्याग व कर्तव्यबुद्धी यांचा संगम आहे. त्यांच्या सारख्या सात्त्विक गृहिणीमुळेच समाजाची, राष्ट्राची पाया, रचना बळकट होत असते. त्यांचे जीवन हा नव्या पिढीला अनुकरण करण्याजोगा आदर्श आहे.