उद्योगधंदे चालवताना आपण केवळ त्या उद्योगाचे विश्वस्त आहोत, अशी नम्र जाणीव त्यांनी कायम ठेवावी. आपल्या कारखान्यातून निर्माण होणारी संपत्ती ही केवळ आपली नाही, तर ती समाजाचीही आहे, असे मानून मालकांनी आपल्या गरजांपुरता आणि शक्य तितका कमी हिस्सा स्वतःकडे ठेवावा. उर्वरित संपत्तीचा उपयोग कामगारांच्या कल्याणासाठी आणि उद्योगाच्या पुढील वाढीसाठी करावा. 

- आबासाहेब गरवारे