आबासाहेबांच्या चारही मुलांनी त्यांच्या व्यवसायात प्रवेश केला, हा केवळ एक संयोग नव्हता, तर तो आबासाहेबांच्या दूरदृष्टीने आखलेल्या योजनेचा भाग होता. आबासाहेबांनी मुलांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवले. "मी हा व्यवसाय तुमच्यासाठी उभा करतो आहे. तुम्हीच तो पुढे नेला पाहिजे," हा संदेश त्यांनी मुलांच्या मनावर ठरावाला. या चौघा बंधूंनी आधुनिक शिक्षण, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि पारंपरिक मूल्ये यांचा योग्य समन्वय साधत गरवारे उद्योगसमूहाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान मिळवून दिले.